साताराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. सातारची भूमी शिवरायांच्या तसेच स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. स्वातंत्रपूर्व काळात सातारामध्ये अनेक क्रांतीकारक होउन गेले. त्यांची स्मृती आजही साता-यात आहे. सातारा युवकांना प्रेरणा देणारा आहे. अशाच काही प्रेरणादायक वास्तूंची ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे.

 
अजिंक्‍यतारा हा किल्ला सातारचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो.हा किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यतील आहे. सातारा शहराच्या अगदी जवळ आहे. प्रतापगडापासून फुटणार्‍या बामणोली रांगेवर अजिंक्‍यतारा उभारलेला आहे. अजिंक्‍यतार्‍याची उंची साधारणत: ३०० मीटर असून ती दक्षिणोत्तर विस्तार ६०० मीटरआहे.सातारचा किल्ला (अजिंक्‍यतारा) म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामातंर अजिंक्‍यतारा केले., पण पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला. मात्र १७०८ मध्ये शाहूने फितवून किल्ला घेतला आणि स्वत:स राज्याभिषेक करून घेतला. पुढे पेशव्यांकडे हा किल्ला गेला. दुसर्‍या शाहूच्या निधनानंतर किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये इग्रजांकडे गेला. किल्ल्यावरून समोरच यवतेश्वराचे पठार, चंदनवंदन किल्ले, कल्याणगड, जरंडा आणि सज्जनगड हा परिसर दिसतो. भारतामध्ये अनेक गड-किल्ले आहेत पण तारा (स्टार) आणि अजिंक्य (अनडिफेटेबल) नाव असणारा एकच अजिंक्यातारा आहे. साताराच्या कोणत्याही भागातून अजिंक्याताराचे दर्शन होते.
 

चार भिंती
शाहूनगरीच्या वैभवशाली काळातील स्मृती जतन करणारी ही टेकडी. या टेकचडीवर सातारचे प्रजाहितदक्ष राजे श्री. छ. प्रतापसिंह महाराजांनी इ. सन 1830 च्या सुमारास चारभिंती म्हणून ओळखली जाणारी इमारत बांधली. या इमारतीस नजर बंगला असे म्हणत. राजघराण्यातील महिला छत्रपतींची दस-याची स्वारी या इमारतीमधून पहात असत. येथे जवळच कोप-यावर टेहळणीची जागा आहे. आज येथे चौथरा दिसत असून त्यावर या ऐतिहासिक इमारतीच्या चारभिंती उभ्या आहेत.
इ.सन 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात झांशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, रंगो बापूजी गुप्ते तसेच हौताम्य पत्करणा-या अनेक शूरवीरांच्या स्मरणार्थ इ.सन 1957 मध्ये शाहूनगर वासीयांनी आदराने पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या शताब्धी निमित्ताने उभारला. या क्रांती स्मृति स्तंभाचे व ऐतिहासिक चार भिंतीचे तसेच या परिसराचे नूतनीकरण महाराष्ट्र दिन 1 मे 2001 रोजी करण्यात आले.

 

हुतात्मा स्मारक-फाशीचा वड
मायभूमीच्या मुक्तीसाठी रक्त जयांचे वाहीले.. त्याग समर्पणानि देशभक्तीया स्तंभ ते जाहले.
 दिवशी इंग्रजांच्या निर्दयी कृत्यामुळे जेथे 17 क्रांतीतिवीरांना प्राणास मुकावे लागले तीच ही हौताम्य भूमी. आज येथे तो ऐतिहासिक फाशीचा वड नाही पण येणा-या पिढ्यान पिढ्यांना प्रेरणा देईल असा हुतात्मा स्तंभ मात्र आहे. क्रांतिवीरांच्या बलीदानाचे व देशभक्तीचे स्मरण तो देत राहील.
या भूमीवर घेवून वीरमरण हुतात्मा ते झाले. देशासाठी देवून प्राण चिरंजीव ते झाले. अशा शूरां मी वंदिले.

इ. सन 8 सप्टेंबर 1857 दिवस –
फाशी देण्यात आले
नारायण (नाना) बापू पावसकर
केशव निलकंठ चित्रे
शिवराम मोरेश्र्वर (बहुश्रुत) कुलकर्णी
विठ्ठल कोंडी (तात्या) वाकनीस
सीताराम रंगो गुप्ते

गोळ्या घातल्या
रामजी बापूजी उर्फ रामसिंग चव्हाण
बांब्या हणगू शिरतोडे
नाम्या नाईक चव्हाण
शिवाजी सोमाजी पाटोळे
पर्वजी विठोबा साळुंखे
पाटलू येसू घाटगे

तोफेच्या तोंडी दिले
मुनाजी उर्फ बापू (नारायण)
बाबर उर्फ भांदिर्गे
सखाराम बळवंत शेट्ये (चव्हाण)
बाब्या नाथ्या गायकवाड
येशा नाथ्या गायकवाड
गणेश सखाराम कारखानीस
नान उमाजी रामोशी (मुडके)

 
सातारामध्ये सन 1946 रोजी जवाहर बाग स्थापन झाली. या बागेमध्ये स्वातंत्र्य युद्धात बलिदान केलेल्या असंख्य हुतात्म्यांची स्मृति म्हणून राष्ट्र ध्वज स्तंभ ता. 15 ऑगस्ट 1947 रोजी उभारण्यात आला. त्याची देणगी सातारा इलेक्ट्रीकल यांनी दिली होती. 15 ऑगस्ट तसेच 26 जानेवारी रोजी या ठिकाणी झेंडा वंदन केले जाते. या बागेला गोल बाग म्हणूनही ओळखले जाते. या बागेमध्ये श्री. छ. प्रतापसिंह महाराज यांचा पुतळा आहे. तसेच या पुतळ्याच्या चौथ-यावर अनेक क्रांतीविरांचा उल्लेख आहे.
 

छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरू समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने वास्तव्याने सज्जनगड पावन झाला आहे. अजिंक्याताराच्या पश्चिम बाजूस हा गड आहे. याच गडावर समर्थ रामदास स्वामी यांनी माघ वद्य नवमी शके १६०३ - सन १६८१ - रोजी रामदासस्वामींनी सज्जनगडावर देह ठेवला.हा गड उभ्या महाराष्ट्राला प्रेरणा देणारा आहे. गडाच्या पायथ्याशी समर्थ दर्शन हा एक समर्थ रामदास यांच्या जीवनावरील थीम पार्क नुकताच उभारण्यात आला आहे. यामध्ये समर्थांच्या कार्याची ओळख होते.

 
वरील भागावर जाण्यासाठी मला टिचकी द्या ---